सावधान रहा विसरू नये कधी
सावधान रहा विसरू नये कधी ।
आयुष्याची संधी पुन्हा नये ||धृ ||
काय करावे ते याच् जन्मी होते ।
गेलिया मागुते दुःखी व्हाल ||1||
दया नाही जरा यमाचिये चित्ती ।
कोण जन्म होती कैसे सांगो ? ||2||
तुकङ्यादास म्हणे मृत्यु ठेवा डोळी ।
भजा वंनमाळी अहोरात्री ? ||3||