ऐसे वाटे मना, घडो प्रभू - चिंतन
(चाल: झाले रामराज्य...)
ऐसे वाटे मना, घडो प्रभू - चिंतन ।
राहो मुखी नाम, मन ध्यानी तल्लीन ॥धृ०।।
कुणाचाही छळ मनी, वाणीही नये ।
आपुलेसे व्हावे, सकळ जन पराये ।।१।।
गुण दुसऱ्यांचे, सदा पडावे कानी ।
अवमुण अपुले दिसोत या डोळ्यांनी ॥२॥
तुकड्यादास म्हणे,जीव होवो समरस ।
ऐसा निजध्यास, लाभो अंगी तो रस ।।३।।